मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

शेतकऱ्याची मानसिकता बदलणे गरजेचे

गावाचे शहर होणं म्हणजे आपण विकास समजतो ना! तिथेच आपण चुकतो, आजपासून वीस वर्षे आधी आपल्या गावात ना धड रस्ते होते ना कारखाने पण माणूस तेव्हा ही जगतच होता, उलट त्या काळी नैसर्गिक शेती करून बेस्ट कॉलिटी अन्न खायचं आणि नॅचरल मिनरल वॉटर प्यायच, सुंदर नैसर्गिकरित्या बनवलेल्या घरात राहायचं,त्या काळचा समाज पैशापेक्षा माणुसकी जपणारा समाज होता. आज पैसा आला पण माणसातले माणूसपण हिरावून गेला. गावाकडे राहणारा तरुण वर्ग शहराच्या दिशेनं डोळे लाऊन बसतोय तर दगदगित फसलेला शहरातील चाकरमानी वर्ग गावाच्या दिशेने.प्रत्येकाच्या डोळ्यात एकच ध्येय "सुख शोधणे".
प्रत्येकाला वाटत असते आपल्यापेक्षा तो जास्त सुखी आहे. असो, मुद्दा हा आहे की शेतीला व्यवसायाचे स्वरूप कसे द्यायचे? असे काय करावे लागेल शेतकऱ्याला की शेती ही profitable business होईल. एक तर शेतकऱ्याला स्वतःची मानसिकता बदलावी लागेल आणि दुसरे म्हणजे शेतीला स्वतःचा व्यवसाय समजावे लागेल. मानाने मिरवत हे सांगण्याची धमक आली पाहिजे की मी एक Entrepreneur आहे आणि शेती माझा business आहे. मगच तुम्ही जोमाने कामाला लागाल आणि so called SUCCESS मिळवाल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Guide to Oil Palm Plantation Methods

  A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...